शहरातील 13 टक्के पाणी दूषितचा अहवाल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 10, 2021

शहरातील 13 टक्के पाणी दूषितचा अहवाल.

 शहरातील 13 टक्के पाणी दूषितचा अहवाल.

पिण्याचे पाणी दुषित असल्याच्या नागरिकांच्या
तक्रारीवर आरोग्य विभागाचं शिक्कामोर्तब.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याचा दूषित पाणीपुरवठा होत असून या संदर्भात विविध पक्षातील नगरसेवक व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. विशेषतः स्टेशन रोड परिसरातील आगरकर मळ्यात पिण्याचा पाण्याचा घाण वास येत असल्याची तक्रारही नागरिकांनी केल्या होत्या. शहरातील अनेक प्रभागातून अशा तक्रारी येऊ लागल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील प्रयोग शाळेने दोन महिन्यांपूर्वी पाण्याचे नमुने घेतले होते. हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याबाबत प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात आली या पाण्याचा धक्कादायक अहवाल आला असून.शहरातील 13 टक्के  भागातील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहे. अहमदनगर शहरातील रोजचे पिण्याचे पाणी काही ठिकाणी दूषित असून या बाबत महापालिकेने उपाय योजना कराव्यात असे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक हेमंत कुलकर्णी यांनी दिले आहेत.
या दूषित पाण्यामुळे मलेरिया, कावीळ यांसारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा असंही प्रयोगशाळेने महापालिकेला कळविले आहे. तर महापालिकेने शहरातील पाण्याची टाक्यांची स्वच्छता केली असून ज्या ठिकाणी दूषित पाणी येत होते त्या ठिकाणी आता स्वच्छ पाणी येत असल्याचं महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment