पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क.
आरपीआय आठवले गटाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घेण्याची मागणी नगर तालुका आरपीआय आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकार हे मागासवर्गीयांच्या विरोधात सरकार असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला. पदोन्नती आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित द्यावा यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर तालुका आरपीआयच्या वतीने मागणी करण्यात आली आहे पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे जर सरकारने निर्णय न घेतल्यास तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, संजय कांबळे, मा.नगरसेवक अजय साळवे, शरद बनसोडे, विवेक भिंगारदिवे, बापू जाधव, किशोर कांबळे, कृपाल भिंगारदिवे, वैभव बनसोडे, आकाश भालेराव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment