अहमदनगर महाविद्यालयाने ऑनलाइन साजारा केला अहमदनगर शहर स्थापना दिन
विविध विद्यापीठांमधील 2504 जणांचा सहभाग
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोविड 19 महामारिचे संकट लक्षात घेऊन अहमदनगर महाविद्यालयाने 28 मे, ‘अहमदनगर शहर स्थापन दिवस’ आनललाइन साजरा केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रजनीश बार्नबस यांच्या प्रेरणेतून इतिहास विभागाने अहमदनगर शहर स्थापना दिनाचे औचित्य साधून ऑनलाइन पद्धतीने प्रश्न मंजुषा आयोतित केली होती. या उपक्रमात विविध विद्यापीठातील 2504 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
सीना नदीच्या काठी पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन झालेल्या अहमदनगर शहराचा 28 मे हा स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. या शहराची अनेक अंगांनी ओळख आहे. निजामशाहीत असलेला या शहराची तुलना तत्कालीन जगतातील बगदाद व कैरो या शहरांशी केली जात असे, शहाजीराजे भोसले यांच्या कर्तुत्वाने स्वराज्याचे स्वप्न पहिले गेले त्या घटनेचा साक्षी भातोडी-पारगाव येथील तसेच ब्रिटिश काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार बल्लभभाई पटेल यांचे भुईकोट किल्ल्यात असलेले वास्तव्य. पंडित नेहरू यांचेकडून डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे याच शहरात झालेले लेखन इत्यादी अनेक वैशिष्ट्यां वर आधारित प्रश्न या प्रश्न मंजुषा मध्ये विचारले गेले होते. अहमदनगर महाविद्यालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या या प्रश्नमंजुषा उपक्रमास सबंध देशातील 2504 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . कोरोनाजन्य परिस्थितीमुळे गुगलफॉर्मच्या माध्यमातून प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले.
डॉ विजय कदम, इतिहास विभाग प्रमुख आणि विभागातील प्राध्यापकांनी आयोजित केलेल्या या प्रश्नमंजुषा मध्ये 14 आणि अधिक विद्यापीठांमधील 2504 विद्यार्थी/प्रध्यापक यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अरविंद नागवडे, डॉ. रझाक सय्यद, रजिस्ट्रार श्री दीपक अल्हाट आणि आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांचा सहयोग लाभला.
No comments:
Post a Comment