सरकार आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात कमी पडले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

सरकार आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात कमी पडले.

 सरकार आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यात कमी पडले.

आ. विखेंचा आघाडी सरकारवर हल्ला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाविकास आघाडी सरकाने सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणा संबंधी जी बाजू मांडायला पाहिजे ती मांडली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज इंग्रजीत चालते आरक्षणाचे स्टेटमेंट मराठीत होते. हे सरकार त्याचे इंग्रजीत भांषातर करून देवू शकले नाही. तसेच सरकार भूमिका मांडण्यात कमी पडले. आजतागायत या सरकारने पुर्नयाचिका दाखल केली नाही.त्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. समाज बांधव जी भूमिका घेतील त्यास आमचे समर्थन राहील. पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. असे प्रतिपादन माजी विरोधीपक्ष नेता मा.आ.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  
माजी विरोधी पक्षनेते, भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर शहर व तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या समवेत मराठा आरक्षणासंदर्भात मार्केट यार्ड मधील सभागृहात बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते.  आ. विखे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे कोणत्याही विषया संदर्भात गंभीर नसून सत्तेमध्ये टिकून राहणे हाच एकमेव कार्यक्रम आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे आणि हे सरकार आर्थिक व्यवहार करण्यात गुंतले आहे.  या संदर्भात या सरकारची शोध पत्रिका काढणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे आरक्षण न टिकण्यास सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे.  माजी मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व कागदपत्राची जुळवा जुळव करून आरक्षण देण्याचे काम केले. परंतु या महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालण्याचे काम केले. मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी भाजप समाजाबरोबर आहे. भाजप सरकारने अनेक वर्षाची असणारी मराठा समाजाची मागणी पूर्ण केली होती.
माजी मंत्री मा.श्री.शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, राधाकृष्ण विखे यांचे नेतृत्वाखालील राज्यभर मराठा आरक्षणाबाबत दौरा सुरू करण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात भाजपा सरकारचा कार्यकाळ सोडला तर सर्व काळ निराशाजनक गेला आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले नाही. माजी मुख्यमंत्री मा.आ.श्री.देंवेद्र फडणवीस यांच्या कडून मराठा समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु सरकार बदलले आणि या सरकारची भावना मराठा समाजाला आरक्षण देण्याची नाही. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येवून मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला पाहिजे. नगर शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीने लवकरच सर्व समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी भव्य असे वसतीगृह उभे केले जाणार आहे असे ते म्हणाले.
जिल्हाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत गाडे म्हणाले की, राजकारणामुळे मराठा आरक्षणाचा चोथा झाला आहे. आता समाजाचा कोणावरही भरवसा राहिलेला नाही. विनाकारण आंदोलने करून मराठा समाजातील मुलांवर नाहक गुन्हे दाखल होत आहेत. वसतीगृहासाठी नगर शहरामध्ये फडणवीस सरकारने जागा देण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अडचणीमुळे ती जागा मिळाली नाही. आता मनपाच्या माध्यमातून व मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप , महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या माध्यमातून मिळणार आहे.  मराठा समाजाची मोठया प्रमाणात गळचेपी झालेली आहे. नुसती चर्चा करून चालणार नाही तर कृती करा. आरक्षण जर मिळणार नसेल तर आर्थिक निकषावर देण्याचा प्रयत्न करा. आदीसह विविध मराठा समाजातील मान्यवरांनी आपली भुमिका मांडली.
याप्रसंगी महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत गाडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अरूण मुंडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे, बाजार समितीचे सभापती मा.श्री.अभिलाष घिगे, सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्कर, मा.श्री.निखील वारे, मा.श्री.बाळासाहेब पवार, मा.श्री.रेवण चोभे, मा.श्री.अनिल करांडे, मा.श्री.सुरेश सुंबे, मा.श्री.बाबासाहेब खर्से, मा.श्री.दिलीप भालसिंग, आदीसह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment