फेज 2 पाणी योजना सुरू करा, बोल्हेगाव, नागापूरला पाणी द्या. - कुमार वाकळे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव नागापुर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा भाग असुन येथे दाट लोकवसाहत आहे. मनपा पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांची पाण्या वाचून हाल होत आहे. या भागातील महिलांना लांब अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. उन्हयाळयाचे दिवस असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा संयम सुटला असून कोणतीही घटना घडू नये यासाठी मनपा प्रशासाने पाणी पुरवठा सुरळीत करावा नगर शहरात सुरू असलेल्या फेज 2 पाणी योजना कार्यान्वीत करून बोल्हेगांव नागापूर परिसराला पूर्ण दाबाने पाणी दयावे अशी मागणी नगरसेवक मा.श्री.कुमारसिंह वाकळे यांनी जलअभियंता श्री.परिमल निकम यांना निवेदनाद्वारे दिले. लोकवस्ती मोठया प्रमाणात वाढत असल्यामुळे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अपु-या पडत असल्यामुळे कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी मनपा प्रशासाने फेज2 द्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे. नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करावा. असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगरसेवक अड मा.श्री.राजेश कातोरे, माजी नगरसेवक मा.श्री.बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment