निवृत्त बँक कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांचे खा.सुजय विखे यांना निवेदन
केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावू- खा.विखेनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशनच्या अहमदनगर शाखेच्यावतीने खा.डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन बँक निवृत्त कर्मचार्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी उमाकांत कुलकर्णी (युको बँक), माणिक अडाणे, अशोक बडवे (पंजाब नॅशनल बँक), वहाडणे (सेंट्रल बँक), श्री.वाळके (युनियन बँक) आदि उपस्थित होेते.
याप्रसंगी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँक कर्मचारी 20-25 वर्षे चांगली सेवा देऊन निवृत्त होतात. परंतु निवृत्तीनंतर बँकांच्या नियमांप्रमाणे निवृत्त कर्मचार्यांना मिळणार्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने पेन्शन अपडेशन, फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युएटी, पी.एफ., आरोग्य विमा आदिंसह विविध मागण्यांबाबत संबंधित विभागाकडे संघटनेच्यावतीने निवेदने देण्यात आली आहेत, परंतु त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. या प्रश्नांसाठी राज्य व देश पातळीवर संघटनेचे प्रयत्न सुरु असून, याबाबत आपण केंद्रीय पातळीवर प्रयत्न करुन निवृत्त कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे म्हटले आहे. यावेळी खा.सुजय विखे यांनी याबाबत लक्ष घालून, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा करुन संबंधीत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment