बुरुडगावमधील कचरा डेपोची हर्षा नारखडे यांनी केली पाहणी..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मितीसाठीमनपा बुरुडगाव येथे अद्ययावत प्लान्ट उभारण्यात आला आहे. बायोगॅस प्रकल्पातून तयार होणार्या गॅसपासून विजनिर्मिती केली जात आहे.
कचरा डेपोवर कचर्याचे विलगीकरण करून प्रक्रिया केली जात आहे. त्या माध्यमातून दैनंदिन संकलित होणार्या घनकचर्याचे शास्त्रोक्त पद्धतीने कंपोस्ट खत तयार केल जाते. अँनिमल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र प्लान्ट उभारण्यात आला आहे. याचबरोबर केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियानाचे मनपाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, आपले शहर आता फाईव्ह स्टार मानांकनासाठी सज्ञ झाले आहे. लवकरच कोणत्याही दिवशी केंद्र व राज्य सरकारचे पथक शहरात येऊन पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी पूर्व तयारी म्हणून पाहणी केली.
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने नगर शहरातील संपूर्ण कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी सुरु केली आहे. ही गाडी दररोज नागरिकांच्या घरापर्यंत जात असून नागरिकांनीही ओला व सुका कचर्याचे विलगीकरण करुन घंटागाडीत टाकावा. महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहर कचरामुक्त व कुंडीमुक्त केले आहे.
अहमदनगर महापालिकेने या अभियानत भाग घेतला असून नागरिकांच्या सहकार्यातून आपण भारत स्वच्छ अभियानामध्ये फाईव्ह स्टार मानांकन नक्कीच मिळवू. प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी बुरुडगाव येथील कचरा डेपोची पाहणी करून या ठिकाणी केली. नगर शहर हे स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी लोकसहभागाची खरी गरज आहे. महापालिकेचे कर्मचारी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे. तरी नगरकरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांनी दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे, राजेंद्र सामल, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment