दिलीप गांधींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे : वसंत लोढा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

दिलीप गांधींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे : वसंत लोढा

 दिलीप गांधींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे : वसंत लोढा

पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्यावतीने शोकसभेचे आयोजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या उभारणीत दिलीप गांधी यांचा सहभाग होता. पतसंस्थेच्या प्रमुख संस्थापक सभासदांपैकी ते सभासद होते. भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांनी आयुष्यभर निष्ठेने खांद्यावर घेवून जिल्ह्यात भाजपचे पायामुळे रोवले. पक्षाला बळकटी देण्याचे काम त्यांनी केले. दिलीप गांधी यांच्याशी काही बाबतीत मतभेद असले तरी त्यांनी खासदार व मंत्री म्हणून केलेल्या कामांमुळे जिल्ह्याच्या विकासात मोलाची भर टाकली आहे हे कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी स्व.दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी चेअरमन वसंत लोढा, मानद सचिव विकास पाथरकर, जेष्ठ संचालक सुधीर पगारिया, संचालिका शैला चंगेडे, नकुल चंदे, किरण बनकर, आर.डी.मंत्री, नरेंद्र श्रोत्री, अनिल मोहिते, धनंजय तागडे, व्यवस्थापक निलेश लाटे, उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment