शिवाजी महाराजांनी अन्यायाविरोधात लढा देऊन न्याय प्रस्थापित केले -सुनिल सकट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

शिवाजी महाराजांनी अन्यायाविरोधात लढा देऊन न्याय प्रस्थापित केले -सुनिल सकट

 लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

शिवाजी महाराजांनी अन्यायाविरोधात लढा देऊन न्याय प्रस्थापित केले -सुनिल सकट

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःलहुजी शक्ती सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकार्त्यांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, दत्ता वामन, फरहान शेख, संदीप सकट, अजहर शेख, महेंद्र वाघुंडे, सोहेल शेख, निहाल शेख, कुनाल हरबा, शुभम ढोबळे, प्रसाद सकट आदी उपस्थित होते.सुनिल सकट म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरोधात लढा देऊन न्याय प्रस्थापित केले. रयतेला केंद्रबिंदू मानून आपले राज्यकारभार केले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन प्रत्येकाने वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment