महिलांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती व्हावी-अरुणा गोयल
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय संस्कृतीत सण-समारंभाला विशेष महत्व आहे. निसर्गानुरुप विविध सण हे पूर्वीपासून साजरे करण्यात येत आहेत. त्याचे कौटूंबिक, आरोग्यदायीही महत्व आहे. त्यामुळे या सण समारंभाकडे हे इव्हेंट म्हणून न पाहता एक संस्कृती म्हणून पहावे. संक्रांत आणि त्यानिमित्त होणारे हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी पर्वणीच असते. यानिमित्त महिला एकत्र येऊन आपले सूख-दु:ख वाटून घेत असतात. या समारंभानिमित्त समाजप्रती आपले कर्तव्य जागृत करण्यासाठी महिलांना वाण म्हणून रोपे भेट देण्यात आली आहे. निसर्गाचे संवर्धन व्हावे, प्रदुषणास आळा बसवा आणि यानिमित्त महिलांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्या नगर शहरप्रमुख अरुणा गोयल यांनी केले.
शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख अरुणा गोयल यांच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण म्हणून रोपे देण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका सुवर्णा जाधव, सुवर्णा गेनप्पा, मंगल लोखंडे, चैताली गोयल, सविता शिंदे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सुरेखा कदम यांनी वाण म्हणून रोपे भेट देण्याच्या उपक्रमाचे कौतुक करुन, पर्यावरण रक्षणामध्ये महिलांनीही पुढाकार घेतला पाहिजे. अशा उपक्रमातूनच समाजजागृती होत असते, त्यामुळे अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment