रहदारीस अडथळा ठरणारे विजेचे खांब त्वरीत हटवा!
नगरसेवक रामदास आंधळेंची मागणी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उपनगरांच्या माध्यमातून नगर शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. उपनगर परिसराचा विस्तार होत असतांना भुखंडांचे प्लॉटींग झपाट्याने होत आहे. या विस्तारीत भागात नव्याने वीज जोडणी देतांना तसेच वीजेचे खांब रोवतांना व वीज तारा ओढतांना महावितरणने दक्षता घेऊन नियोजनपूर्वक वीजेचे खांब उभारावेत अशी मागणी नगरसेवक रामदास आंधळे यांनी केली आहे.
उपनगरांच्या विस्तारीत भागात वीजेचे खांब उभारतांना तेथील भूखंडांची रचना, ले आऊट कसा आहे, ले आऊट मध्ये रस्ता किती फुट आहे याची खातरजमा करून खांब उभारल्यामुळे रस्ता व नजीकचा भूखंड बाधीत होणार याची दक्षता घेण्यात यावी. यामुळे भविष्यात अशा भागात रस्ते बनवतांना वीजेच्या खांबांचा वीजेच्या तारांचा अडथळा निर्माण होणार नाही. याच बरोबर मुळ नगर शहरातील अनेक भागांमध्ये वीजेच्या खांब व रोहीत्रांमुळे रहदारीस अडथळा होतो. अनेक ठिकाणी जमीनीपासून वीजवाहक तारांचे अंतर कमी झाले असून तारांना झोळ पडल्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटनादेखील घडू शकते. मनपा व महावितरणने समन्वय ठेवल्यास कामकाजात सुसूत्रता येईल, असे श्री आंधळे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment