कोरोनाच्या काळामध्ये आ. संग्राम जगतापांचे उल्लेखनीय काम ः कवडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 21, 2020

कोरोनाच्या काळामध्ये आ. संग्राम जगतापांचे उल्लेखनीय काम ः कवडे

 कोरोनाच्या काळामध्ये आ. संग्राम जगतापांचे उल्लेखनीय काम ः कवडे

अश्वमेध युवा मंचच्यावतीने आ. संग्राम जगतापांना सन्मानपत्र प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना विषाणू हा संसर्ग विषाणू असल्यामुळे तो नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात फैलावत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असताना नागरिकांना धीर देण्याचे काम मा.आ. श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी नगर शहरामध्ये गेली 6 ते 7 महिने सातत्याने करित आहे. नागरिकांमधील कोरोना आजारा संदर्भातील भिती दूर करण्याचे काम त्यांनी केले कोरोनाच्या काळामध्ये विविध गरीब कुटुंबाचा रोजगार गेला होता. त्यांना अन्नधान्याच्या रूपाने मदत करण्याचे काम केले आहे. विविध हॉस्पीटलमध्ये रूग्णांना दाखल करण्यापासून ते त्यांना औषधे मिळून देण्यापर्यत त्यांनी काम करित आहे. त्यांनी नगर शहरातील गरजू कोरोनाच्या गंभीर रूग्णांना रेमडेसिव्हीअर इंजेक्शन मोफत मिळून देण्याचे काम त्यांनी केले. अनेक रूग्णांना त्यांनी ख-या अर्थाने जिवदान देण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून पुणे येथील अश्वमेध युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आमदार श्री.संग्रामभैय्या जगताप यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आला असे प्रतिपादन संस्थेचे सस्थापक अध्यक्ष गणेश कवडे यांनी केले आहे.

कोरोनाच्या काळामध्ये  आमदार श्री.संग्रामभैय्या जगताप यांचे उल्लेखनिय काम.केल्या बद्दल पुणे येथील अश्वमेध युवा मंच महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करताना मा.श्री.गणेश कवडे ,चाकण नगरपरिषदेचे उपनगराध्य मा.श्री.विजय मुटके, मा.श्री.अक्षय भोर, मा.श्री.अश्विन भुरूक मा.श्री.भुषण गुंड, मा.श्री.संतोष ढाकणे, मा.श्री.वैभव ढाकणे, मा.श्री.मोहन गुंजाळ, मा.श्री.विजू सुबे, मा.श्री.सागर शिंदे, मा.श्री.राहुल ठोंबरे मा.श्री.अक्षय डाके आदी उपस्थित होते.
मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, नगर शहरातील जनतेने माझ्या कामावर विश्वास टाकून मला महापौर व आमदारकी पदाची संधी दिली या संधीच्या माध्यमातून समाजाची सेवा करणे हे माझे कर्तव्य समजतो या माध्यमातून मी काम करित आहे. विकास कामाबरोबरच सामाजिक बांधीलकी जोपासने गरजेचे आहे. कोरोनाचा काळ हा मनुष्य जीवनाला वेदना देणारा काळ ठरला आहे. या काळात प्रत्येकाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून मी कोरोनाच्या काळात काम करित आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment