दैठणेगुंजाळ येथील शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज देण्याची मागणी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः दैठणेगुंजाळ (ता. पारनेर) येथील विकास सेवा संस्थेकडून शेतकर्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज देण्याच्या मागणीसाठी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने पारनेर तालुका उपनिबंधक सुखदेव सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष वजीर सय्यद, जिल्हाध्यक्ष अंकुश ठोकळ, संपर्क प्रमुख गणेश निमसे, पारनेर तालुकाध्यक्ष रावसाहेब झांबरे उपस्थित होते.
विकास सेवा संस्थेकडून शेतकर्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. सोसायटीचे सभासद मल्हारी झांबरे यांनी सोसायटीमार्फत वेळोवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वेळोवेळी खरीप हंगामचे नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी संस्थेत मागणी केली होती. तरी त्यांना पीक कर्ज देण्यात आलेले नाही. मागील तीन महिन्यापासून मल्हारी झांबरे या संदर्भात पाठपुरावा करीत आहेत.
No comments:
Post a Comment