अहमदनगर ‘आरटीओ’मध्ये होणार लवकरच मोठा बदल.
प्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरमधील उप प्रादेशिक कार्यालयाचं लवकरच प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) रूपांतर होणार आहे. परिवहन विभागाने यास मंजुरी दिली असून तसा प्रस्ताव वित्त विभागाकडे देण्यात आला आहे.
राज्यातील 15 उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचे रुपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयांत म्हणजेच आरटीओ मध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये अहमदनगरचा समावेश आहे.
अहमदनगरच्या या कार्यालयाचा दर्जा उंचावल्यानंतर महत्वाच्या आणि धोरणात्मक निर्णयांसाठी नागरिकांना नाशिकवर अवलंबून राहण्याची गरज नाही. शिवाय नगरला आरटीओ झाल्यास श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक कार्यालयाप्रमाणे दक्षिण भागात आणखी एखादे उपप्रादेशिक कार्यालयही भविष्यात होऊ शकते. अहमदनगरचे कार्यालय अलीकडेच नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे यासाठी वेगळा खर्च करण्याचीही गरज पडणार नाही. परिवहन विभागाने राज्यातील सर्व कार्यालयांचा आकृतीबंध नव्याने तयार केला आहे. त्यामध्ये या पंधरा कार्यालयांचा दर्जा उंचावण्याचा सनावेश आहे. सोबतच अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संख्येतही बदल होणार आहे. ऑनलाइन सेवा वाढल्याने लिपिक वर्गीय कर्मचार्यांची तसेच कनिष्ठ अधिकार्यांची संख्या कमी होणार असून नव्या कार्यालयांमुळे अधिकार्यांची संख्या काहीशी वाढणार आहे. सध्या नगर जिल्हा नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येतो. नगर आणिश्रीरामपूर ही दोन्ही कार्यालये नाशिकला जोडली आहेत. अहमदनगरला प्रादेशिक परिवहन कार्यालय झाल्यास येथे वरिष्ठ अधिकारी येतील, श्रीरामपूरही नगरला जोडले जाईल. यामुळे नागरिकांना कामासाठी नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही.
No comments:
Post a Comment