आ. लंके यांची शिष्टाई सफल : कुकडीचे आवर्तन २५ ऐवजी १७ मार्च ला सुटणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 8, 2022

आ. लंके यांची शिष्टाई सफल : कुकडीचे आवर्तन २५ ऐवजी १७ मार्च ला सुटणार

 आ. लंके यांची शिष्टाई सफल : कुकडीचे आवर्तन २५ ऐवजी १७ मार्च ला सुटणार.


पारनेर -
कुकडी कालव्याचे  आवर्तन २५ मार्च रोजी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याविरोधात पारनेर तालुक्यातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेत केलेली शिष्टाई सफल झाली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत २५ ऐवजी १७ मे रोजी अवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
जयंत पाटील यांनी दुरध्वनीद्वारे कालवा सल्लागार समितीचे सदस्य गृहमंत्री दिलीप वळसे, घनश्याम शेलार, आ. अतुल बेनके, आ. बबनराव पाचपुते, आ. सुदामराव पवार यांच्याशी चर्चा करून २५ मार्च रोजी सुटणारे अवर्तन १७ मार्च रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस आमदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. दरम्यान, आवर्तनची तारीख जाहिर झाल्यानंतर कुकडी पट्यातील नागरीकांनी आमदार लंके यांची भेट घेउन आवर्तन लवकर सोडण्याची मागणी केली होती. लंके यांनी त्याची दखल घेत सोमवारी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी मंगळवारी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करून २५ ऐवजी १७ मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हा जिव्हाळयाचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment