जिहादी पाकिस्तानला अंकुश लावण्यासाठी विश्व समुदायाने पुढे यावे- विवेक कुलकर्णी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

जिहादी पाकिस्तानला अंकुश लावण्यासाठी विश्व समुदायाने पुढे यावे- विवेक कुलकर्णी.

 जिहादी पाकिस्तानला अंकुश लावण्यासाठी विश्व समुदायाने पुढे यावे- विवेक कुलकर्णी.

कश्मीर मधील हिंदू-शिखांच्या हत्येचा बजरंग दलातर्फे निषेध..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काश्मीर घाटात सात भारतीय व शीख महिलेंची अतिरेक्यांकडून झालेली हत्या हा चिंतेचा विषय असून पाकिस्तानी जिहादी अतिरेक्यांचा पूर्णतः विनाश करण्याकरिता पाकिस्तानला “न भूतो न भविष्यती” असे उत्तर देण्याची गरज आहे. आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणार्‍या जिहादी पाकिस्तानवर अंकुश लावण्या करिता विश्व समुदायाने पुढे यावे.अशी मागणी बजरंग दलाचे क्षेञीय सह संयोजक विवेक कुलकर्णी यांनी केली.
दिल्लीगेट येथे विश्व हिंदु परिषद,बजरंग दलातर्फे पाकीस्तानचा निषेध करुन जिहादी आतंकवादाचा तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी कुलकर्णी बोलत होते.
हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी. हिंदूंच्या काश्मीर घाटीत पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे. हिंदूंच्या सातत्याने निवडून निवडून होणार्‍या नृशंस हत्यांमुळे आहत झालेले बजरंग दलाचे कार्यकर्ते आज देशभरात जिहादी आतंकवादाविरुद्ध तीव्र प्रदर्शन करीत आहेत.भारताच्या पावन भूमीला रक्तरंजीत करण्याचा प्रयत्न करणार्‍या,भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कडक शिक्षा करण्यात यावी. भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देशकृत संकल्प आहे. जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे.आम्ही योग्य पद्धतीने जाणतो.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे. असेही ते म्हणाले.
बलिदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मनःपूर्वक संवेदना प्रगट करत असतांनाच विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारताच्या हातूनच इस्लामिक जिहादी आतंकवादाचा समूळ नायनाट होईल व तो होईपर्यत आम्ही शांत बसणार नाही.असा ईशारा कुलकर्णी यांनी दिला. याप्रसंगी विश्वहिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जय भोसले, मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, बजरंगदलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी,सतिश सायंबर ,शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment