विश्वास घातकी, बदनाम लोक.. बाजार समितीला बदनाम करीत आहेत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

विश्वास घातकी, बदनाम लोक.. बाजार समितीला बदनाम करीत आहेत.

 विश्वास घातकी, बदनाम लोक.. बाजार समितीला बदनाम करीत आहेत.

नगर बाजार समिती सभापती उपसभापतींचा आरोप..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ज्या लोकांनी स्वतः च्या नेत्यांना पक्षाला आणि कार्यकत्यांना फसवले, पाठीत खंजीर खुपसला अशा विश्वासघातकी आणि बदनाम लोकांकडून नगर बाजार समितीला बदनाम केले जात आहे. बाजार समितीवर आजवर अनेक आरोप झाले, चौकशा लागल्या, पण प्रत्येक वेळी बाजार समिती निर्दोष सिद्ध झाली आणि यावेळी ही होईल. राजकीय आणि सरकारच्या दबावाखाली ही नोटीस पाठविण्यात आली असून त्यास योग्य आणि कायदेशीर उत्तर दिले जाईल. असा इशारा नगर बाजार समितीचे सभापती अभिलाष रावसाहेब घिगे व उपसभापती संतोष रामदास म्हस्के यांनी आज पत्रकारपरिषदेत दिला आहे.
याप्रसंगी सभापती अभिलाष घिगे म्हणाले की, महाआघाडीतील जे लोक बाजार समितीवर आरोप करत आहेत त्यांची विश्वासहर्ता काय आहे. संदेश कार्ले शेतकरी हिताचा आव आणतात त्याच कार्ले यांनी स्वतः च्या स्वार्थापोटी जिल्हा परिषद विषय समिती पदासाठी प्रा. गाडे यांचा आदेश मानला नाही. तालुका शिवसेना ताब्यात घेऊन हुकूमशाही करतात असे शिवसैनिक आम्हाला सांगतात. त्यांना जिल्हा प्रमुख आणि आमदार होण्याची घाई झाली आहे. आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्याच पक्षातील अनेकांचे खच्चीकरण केले.पदाचा आणि पक्षाचा वापर फक्त स्वतः च्या स्वार्थासाठी केला. विधान परिषदवेळी पक्षाच्या नेत्यांशी गद्दारी करत कितीची पाकिटे घेतली आणि मतदान कोठे केले हे सांगितल्यास जनता यांना दारात उभी करणार नाही..
बाळासाहेब हराळ तर प्रत्येक निवडणुकीत आपला नेता बदलतात.  दादा पाटलांनी जीवाचे रान करत हराळांना निवडुन आणले पण मतमोजणीच्या रात्रीच ते विखे पाटलांच्या गटात सामील झाले. विधान परिषदेत त्यांनी प्रा. गाडे यांना मतदान केले का ? हे शपथ घेऊन सांगावे. ते कोणत्या पक्षात आहेत आणि त्यांचा नेता कोण हे त्यांनाच सांगता येणार नाही. त्यामुळेच गुंडेगाव च्या लोकांनी ग्रामपंचायत मध्ये त्यांचे पार्सल नगरला पाठवले आहे. याच हराळ यांनी 1 महिन्यांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी आम्ही मंत्र्यांना भेटलो, प्रशासक आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे सांगितले होते.. नोटीस हा त्या पूर्व नियोजित कटाचा भाग आहे.गोविंद मोकाटे यांना मनोसोपचार तज्ञाची गरज आहे. कायदा त्यांना समजतो की नाही ते माहिती नाही. महाआघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी किती कार्यकर्त्यांना कामे दिली, रोजी रोटी दिली ते जनतेसमोर येऊन सांगावे. स्वतः हे सर्व ठेकेदारी करतात आणि जनतेच्या हिताचा आव आणतात. महाआघाडी चे नेते म्हणणारे अनेक जण छुप्या पध्दतीने माजी मंत्री यांच्याशी येऊन भेटतात आघाडीच्या या नेत्यांचा खरा चेहरा, कार्यकर्त्यांना आणि लोकांना समजला आहे. त्यांचेच कार्यकर्ते आमचा फक्त निवडणुकी पुरता वापर केला गेला उघड पणे बोलू लागले आहेत. त्यामुळे स्वतःचा विश्वासघातकी पणा आणि बदनामी झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरी कडे वळवण्यासाठी बाजार समितीला बदनाम करत आहेत. बाजार समितीमध्ये वातावरण तापवायचे, सर्वसामान्य कार्यकत्यांना उभे करायचे आणि अखेरच्या टप्प्यात हातच राखून काम करत पॅनल पाडायचा कारण कोणी दुसर नेतृत्व तयार होऊ नये म्हणून आणि सांत्वन करायला निवडणुकीत  वापर करून घ्यायचा ही या लोकांची करणी आता उघड होऊ लागली आहे. मागील बाजार समितीमधील पराभूत उमेदवार आम्हाला भेटून हे सांगत आहेत. राज्यात सत्तेवर असल्याने सरकारी यंत्रणेचा वापर करत आहेत. असेही घिगे म्हणाले.
याप्रसंगी संचालक रेवणनाथ चोभे, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब खरसे, दिलीप भालसिंग, शिवाजी कार्ले, बबनराव आव्हाड, बहिरू कोतकर, वसंतराव सोनवणे, उद्धव कांबळे, संतोष कुलट होते.

No comments:

Post a Comment