मनपा कर्मचारी पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आ.जगताप.
कोरोना काळात मृत्यूमुखी पावलेल्या कर्मचार्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लॉक डाऊनच्या काळामध्ये सर्व नागरिक घरी होते परंतु महापालिकेचे कर्मचारी हे नागरिकांना सेवा देण्यासाठी कार्यरत राहिले. या कोरोनाच्या काळामध्ये मनपाच्या 19 कर्मचार्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेने कोरोना मध्ये मृत्यू पावणार्या मनपा कर्मचार्यांच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून 50 हजार रुपयांचा धनादेश देण्याचे काम केले आहे व आपण सर्वजण त्या कुटुंबाचे ऋणी आहोत. मनपा कर्मचारी पतसंस्थेचे सभासदांसाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने संकट काळामध्ये माणुसकीच्या भावनेने आधार देण्याचे काम केले आहे. मनपा कर्मचारी हे पतसंस्थेचे सभासद असून त्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी व त्याचां कुटुंबाचा आधार देणेसाठी केलेले कार्य कर्तव्यदक्ष आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. अहमदनगर महानगरपालिका सहकारी पतसंस्थेच्या वतीने कोरोणा काळामध्ये सभासदांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना मदत म्हणून पन्नास हजार रुपयाचे धनादेशाचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आ. जगताप म्हणाले की महानगर पालिकेच्या कर्मचार्यांनी कोरोणाच्या महाभयंकर संकट काळामध्ये आपली जबाबदारी सक्षम पणे पार पाडत आहेत. कोरोनाचा संसर्गजन्य विषाणू आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. नगर शहरामध्ये कॅन्टोन्मेंट झोन असतानाही महापालिका कर्मचार्यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा,दिवाबत्ती असे दैनंदिन मूलभूत प्रश्न आपला जीव धोक्यात घालून सोडवत होते. चेअरमन बाळासाहेब पवार म्हणाले की अहमदनगर महापालिका कर्मचारी पतसंस्थाने नेहमीच सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना काळामध्ये मनपा कर्मचार्यांची सेवा देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम म्हणून 8 सभासदांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मागील वर्षीही चार सभासदांचा वारसांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला होता . मनपा पतसंस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सभासदाच्या अडी अडचणीच्या काळामध्ये पतसंस्थेने विविध निर्णय घेत आहे. पुढील काळातही पतसंस्था ही सभासदांसाठी आधार देण्याचे काम करत राहील असे ते म्हणाले.यावेळी प्रास्ताविक संचालक बाबासाहेब मुदगल यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन विकास गीते यांनी केले. यावेळी चेअरमन बाळासाहेब पवार. व्हाईस चेअरमन विकास गीते. संचालक बाबासाहेब मुदगल. जितेंद्र सारसर. सतिष ताठे. किशोर कानडे. बाळासाहेब गंगेकर. अजय कांबळे. शेखर देशपांडे. प्रकाश अजबे. कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी. बलराज गायकवाड. कैलास चावरे. गुलाब गाडे. विजय कोतकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment