अमृत भुयारी गटार योजनेचे काम थांबवा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

अमृत भुयारी गटार योजनेचे काम थांबवा.

 अमृत भुयारी गटार योजनेचे काम थांबवा.

पाऊसामुळे चिखल... नागरिकांना पायी चालणे मुश्किल.
उपमहापौर यांचे मनपा आयुक्तांना आवाहन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्या पावसाळ्याचा हंगाम असून शहरात सध्या सुरू असणार्‍या केंद्र शासनाच्या भुयारी गटार योजना कामामुळे सर्वत्र चिखल झाला असून, त्यामुळे रस्त्यावर अपघात होत आहेत नागरिकांना चिखलातून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत हे काम थांबविण्याचे आवाहन उपमहापौर गणेश भोसले यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना केले आहे.
शहरांमध्ये केंद्र शासनाची अमृत भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे.मध्यवर्ती शहरामध्ये विविध ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे त्यामुळे खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकली जाते पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर छोटेमोठे अपघात होतात नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते.याचबरोबर भुयार गटार योजनेचे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केल्यामुळे मध्यवर्ती शहरांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत नागरिकांना पायीचालणेही कठीण झाले आहे.तरी अमृत भुयारी गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या सदर मागणीचे निवेदन देखील मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले लवकरात-लवकर कारवाईचे आदेश काढावेत अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेल्या आदेशानंतर ठेकेदाराने पूर्वी केलेल्या संबंधित कामाची अटी व शर्तीनुसार डांबरीकरणाने व काँक्रिटीकरणाने पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे कामे करून घ्यावीत तसेच शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भुयारी गटार योजनेच्या कामामुळे ठिक-ठिकाणी असलेली माती ढीग उचलावी तसेच पूर्ण झालेले भुयारी गटार योजनेचे काम जोडणी करून नागरिकांसाठी कार्यान्वित करावी. जोपर्यंत पावसाळ्या संपत नाही तोपर्यंत भुयारी गटार योजनेचे काम सुरू करू नये अश्या मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment