वाडिया पार्क मित्र मंडळ व गाळेधारकांकडून लॉक डाऊन च्या काळामध्ये गोरगरिबांना रोज दिले जाते मिष्ठान्न भोजन
नगरी दवंडी
अहमदनगर- दिवसेंदिवस कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्याचा परिणाम गोरगरीब जनतेवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे हाताला काम नाही पोटाला जेवण नाही त्यामुळे अनेक जनावर उपासमारीची वेळ आली आहे मात्र अशा काळातही अनेक सामाजिक संघटनेकडून सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात दिला जात आहे जो तो आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे वाडियापार्क मित्र मंडळ व गाळेधारकां कडून अशाच प्रकारे रोज 200 ते 250 गोरगरीब गरजूंना रोज दुपारचे भोजन दिले जात आहे. शहरातील अनेक गोरगरीब गरजू वाडिया पार्क येथे येऊन दुपारी पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतात असे उपक्रम शहरात ठिकठिकाणी राबविल्यास गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येणार जास्तीत जास्त लोकांनी गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन वाडिया पार्क मित्र मंडळ व गाळेधारकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाड्या पार्क मित्र मंडळ व गाळेधारकांच्या वतीने प्रसाद कोके गणेश पवार आशिष साळवे प्रमोद महाडकर रोहित कोके हर्ष पवार उमेश जंगुपटला शाहरुख शेख जगविर चव्हाण रवी चव्हाण अन्नदान बनवण्यासाठी विशेष सहकार्य मुस्ताक कुरेशी शिव शंकर राठोड आदींचे मोलाचे सहकार्य लाभते
No comments:
Post a Comment