लयचेट्टी परिवार व पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाची सांगता दररोज 221 अंध-अपंग, निराधार लोकांना मोफत जेवण वाटप
नगरी दवंडी
नगर - कोरोना महामारीमुळे आज संपूर्ण जग संकटात सापडलेला आहे. या संकटाचे लढण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामध्ये अंध-अपंग निराधार लोकांवरतर उपासमारीची वेळ आलेली आहे. हाताला काम नसल्यामुळे पोटाची खळगी भारावयची कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशाच अंध-अपंग आणि निराधार लोकांसाठी लयचेट्टी परिवार व पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत जेवणाचा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये रोज सकाळी 11 वाजेदरम्यान 221 लोकांना मोफत जेवण पार्सल स्वरुपात देण्यात येत होते. गेल्या 20 दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यात आला; या उपक्रमाची सांगता करण्यात आली.
या उपक्रमांविषयी गणेश लक्षेट्टी म्हणाले की, माणुसकीचा धर्म म्हणून हा उपक्रम चालू करण्यात आला होता. दररोज 221 लोकांना मोफत एक वेळचे जेवण देण्यात आले. आजची परिस्थिती खूप बिकट झालेले आहे. अशा परिस्थितीत अनेकांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदा-रोजगार बंद झाल्यामुळे आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्यात कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुषाचे निधनामुळे निर्माण झालेले संकट त्याहून मोठे. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशांना एक छोटीशी मदत म्हणून हा उपक्रम राबवित आहोत. गोरगरीब, अंध, अपंग, निराधार, कोरोना झालेले रुग्ण त्यांचे नातेवाईक अशांना किमान एक वेळचे जेवण तरी मिळाले पाहिजे, या हेतूने लयचेट्टी परिवार आणि पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम करण्यात आला होता. यापुढील काळातही पुन्हा असाच उपक्रमाचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले.
या उपक्रमासाठी सौ.शिवानी लक्षेट्टी, सौ.लता भागवत, श्रीमती वाघ, श्रीमती तावरे, श्रीमती धरम, श्रीमती क्षीरसागर, सौ. गोदावरी भवर, सौ कोमल सोनवणे, सौ. आरती मारपेली, सौ. मीराताई रेपाळे, सौ.लक्ष्मी बूरा, सौ. स्वाती चीट्याल, सौ. मीना धरणकर आदी जेवण तयार करण्यासाठी परिश्रम घेत रोज 400 चपात्या बनवत होत्या.
हा उपक्रम पद्मशाली सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते, एकदंत गणेश मंडळ, मार्कंडेय महामुनी युवा प्रतिष्ठान, सूर्यमुखी गुरुदत्त युवा विकास प्रतिष्ठान, संघर्ष प्रतिष्ठान स्टेशन रोड, सिद्धिविनायक तरुण मंडळ यांच्यामार्फत जेवणाचे पार्सल गरजूंपर्यंत पोचविण्यात परिश्रम घेत होते.
हा उपक्रम यशस्वीतेसाठी पद्मशाली सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश लक्षेट्टी, अजयकुमार लयचेट्टी, शुभम सुंकी, श्रीनिवास बुरगुल, यशवंत सुंकी,वरद लक्षेट्टी, विशाल द्यावणपेल्ली, अमित सुंकी , अमोल गांजेंगी, दीपक गुंडू, संतोष मदनाल, श्रीकांत आडेप, आशिष रंगा, अमित गाली, श्रीपाद डोळसे आदींनी विषेश परिश्रम घेतले.
यावेळी या उपक्रमास सेवा देणार्या महिलांचा, मित्र मंडळांचा, तरुणी युवकांचा यावेळी पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या उपक्रमाचे मार्गदर्शक श्री गणेश वसव शिवानी ताई लक्षेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी परिसरातील महिलांनी दररोज सकाळी येऊन चारशे चपात्या बनवून त्या पॅकिंग करून देत असत. सुरुवातीला सत्तर लोकांना जेवण देण्यात आले नंतर याचे स्वरूप वाढत गेले रोज दोनशे एकवीस लोकांना जेवण देण्यात येत होते.
No comments:
Post a Comment