पत्रकार दातीर हत्या प्रकरणाचा तपास डी.वाय.एस.पी. मिटकेंकडे वर्ग
विरोधी पक्षनेते फडणवीस दातीर कुटुंबीयांना भेटणार..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे नाव आल्यापासून प्रमुख विरोधी पक्ष भाजपा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, राम शिंदे यांनी दातीर कुटुंबियांची भेट घेवून त्यांना दिलासा देवून या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीसही दातीर कुटुंबीयांना भेटणार आहेत. या पार्श्वभूमीवर दातीर हत्या प्रकरणाचा तपास डी.वाय.एस.पी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे.
राहुरी येथील पत्रकार श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला उी.पे.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत, राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास डी.वाय.एस.पी संदीप मिटके श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment