30 एप्रिल पर्यंत काय बंद काय चालू वाचा सविस्तर
नगरी दवंडी
मुंबई - राज्यात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी असणार आहे.
- रात्री 8 ते 7 या वेळेत नाईट कर्फ्यू लावला जाईल.
- केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल.
- रेस्टॉरंट्सना फक्त टेक टू आणि पार्सल सेवांसाठी परवानगी आहे.
- कार्यालयांसाठी कर्मचार्यांना घरून काम करावे लागेल.
- रात्रीच्या निर्बंधा दरम्यान, केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल
- नाट्यगृहे, उद्याने, क्रीडांगणे बंद राहतील
- शासकीय कार्यालये 50% क्षमतेने कार्य करतील
- बांधकाम, औद्योगिक क्रियाकलाप आणि बाजारपेठा कार्य करण्यास अनुमती दिली जाईल
राज्यात कडक निर्बंध, काय बंद राहणार?
- बार, हॉटेल, मॉल्स बंद राहणार
- नाट्यगृह, सिनेमागृह बंद
- अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सगळं बंद
- शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात संपूर्ण लॉकडाउन
- लोकलमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवास करता येणार
- रिक्षामध्ये फक्त दोन प्रवाशांना परवानगी
- बसमध्ये आसनक्षमतेनुसार प्रवाशांना परवानगी
- राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी
- मास्क न घातल्यास 500 रुपये दंड
- होम डिलिव्हरी सुरू राहणार
- शासकीय कार्यालयं 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार
- धार्मिक स्थळावर देखील काही बंधन
- गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामं सुरू राहणार
No comments:
Post a Comment