वडिलांना ‘त्या’ खुर्चीवर बसवून... मनोज कोतकरांनी दिले संवेदनशीलतेचे दर्शन !
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राजकीय व सामाजिक वाटचालीत नाना ती पदे अनेकांच्या नशीबी येत असतात. मात्र हे पद मिळण्यापाठीमागे वडिलांचे, मित्रपरिवारांचे व गणगोत्यांचे आशीर्वादाचे पाठबळ असते. हे नाकारुन चालणार नाही. याचा जाणिवेतून मनपा स्थायी समितीचे पद भूषविणारे मनोज कोतकर यांनी आपले संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. दोन दिवसात स्थायी समिती पदाचा कार्यकाळ संपणार आहे. या पार्श्वभूमीवर मनोज कोतकर यांनी आपण भूषवित असलेले पद, दालन आणि त्या कामाची ओळख वडिलांना, मित्रपरिवार व गणगोत्यांना कळावी, यासाठी महापालिकेत त्यांना घेऊन आले व आपल्याला मिळालेल्या खुर्चीवर काही काळासाठी वडिलांना बसविले. आई-वडिलांना बोलावून घेऊन आपण करत असलेल्या कामाची ओळख करुन दिली. यातून वडिलांबद्दल असलेले प्रेम व आपुलकी दिसून येते. यावेळी उपस्थित सर्वजण भावूक झाले.स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर हे शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत. वडिलांनी शेतीबरोबरच बैलगाडीतून नागरिकांना पाण्याचे वाटप करण्याचे काम आजही करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वसा पुढे सुरु ठेवण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी घेतला. सर्वांच्या सहकार्यातून सामाजिक कार्य सुरू करुन नगरसेवक पदाचा बहुमान मिळविला. त्यानंतर स्थायी समितीच्या पदावर सर्वांच्या आशीर्वादातून निवड झाली. दोन दिवसानंतर सभापतीपदाची मुदत संपत असल्याने वडील शंकर कोतकर, आई आशाबाई कोतकर, बहीण कल्याण लोखंडे, रावसाहेब मतकर, संतोष मतकर, हरिदास कोतकर, सुभाष कार्ले, मच्छिंद्र ठुबे, लक्ष्मण कोतकर, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर आदींना बोलावून घेऊन चहा-पाण्याचा कार्यक्रम घेतला.
No comments:
Post a Comment