केंद्रीय पथकाकडून स्वच्छतेची पाहणी
अहमदनगर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने काल विविध भागांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला आहे. चालूवर्षी महापालिकेने फाईव्हस्टार मानांकनासाठी नोंदणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेबाबत केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक काल सकाळी नगरमध्ये दाखल झाले. पथकातील चारही अधिकार्यांनी स्वच्छता विभागातील कर्मचार्यांना सोबत घेऊन शहरातील निवासी भागांची पाहणी केली. यामध्ये कचरा कुठे टाकला जातो, वाहने नियमित येतात का, यासह विविध बाबींचा अभ्यास केला असून, त्यांच्याकडून दिल्या जाणार्या गुणांवरच मनपाचे मानांकन अवलंबून आहे.केंद्राच्या एका पथकाने शनिवारी शहरातील शौचालयांची पाहणी केली. शौचालयांची पाहणी करून पथक माघारी फिरले. हे पथक गेल्यानंतर स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी दुसरे पथक नगरमध्ये दाखल झाले. एकापाठोपाठ एक पथके पाहणीसाठी आल्याने स्वच्छता विभागातील कर्मचार्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे.
No comments:
Post a Comment