29 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद
जिल्हाधिकार्यांचा आदेश.
नगरी दवंडी
अहमदनगर - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 29 मार्च पासून ते 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आज काढला आहे.
गेल्या 48 तासात जिल्ह्यात दोन हजारांच्या पुढे कोरोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मार्च2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ही आठवडे बाजार बंद करण्यात आले होते. कोरोना आता संपलाय असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. म्हणून आज जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचा आज आदेश काढला.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. 29 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील, असे या आदेशात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment