संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत महात्मा गांधीजींना अभिवादन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली. संस्थेच्या शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, विक्रम पाठक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका कल्पना भामरे, शिक्षक जगन्नाथ कांबळे, सुशिल आंधळे, सुलभा तरवडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी जितेंद्र लांडगे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आपले सर्व आयुष्य देशसेवेसाठी वेचले. त्यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्वाचा संपूर्ण जगाने स्विकार केला. सत्यग्राहाच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या महान कार्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते.
याप्रसंगी मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनवरील प्रसंगी सांगून त्यांच्या कार्याची ओळख करुन विद्यार्थ्यांना करुन दिली. शेवटी सुलभा तरवडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment