शेतकरी आंदोलनाच्या सन्मानार्थ.. मार्केट यार्ड चौकात चक्काजाम. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

शेतकरी आंदोलनाच्या सन्मानार्थ.. मार्केट यार्ड चौकात चक्काजाम.

 शेतकरी आंदोलनाच्या सन्मानार्थ..

मार्केट यार्ड चौकात चक्काजाम.
मार्केट यार्ड !
दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्या शेतकर्यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोंधात जोरदार घोषणाबाजी करुन नव्याने पारीत केलेले शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे, वीज बिल विधेयक 2020 तसेच कामगार विरोधी संहिता रद्द करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. यापार्श्वभुमीवर नगर पुणा महामार्गावरील मार्केट यार्ड चौकात अ भा. संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कृषी कायदे त्वरित रदद करा या मागणीसाठी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
   आंदोलना मध्ये नरेंद्र मोदी, किसान विरोधी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दिल्ली के किसान के सन्मान मे हम उतरे मैदान मे आदि घोषणा देण्यात आल्या. दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत असल्याचा आरोप हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केला. सरकारकडून आंदोलनकर्त्यांची दडपशाही करण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत. आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकर्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठादेखील खंडित केला जात आहे. काही पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकर्यांवर दगडफेक करत आहेत. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे असा आरोप करत अ‍ॅड कॉ सुभाष लांडे यांनी सरकारच्या या दडपशाहीचा निषेध व्यक्त केला.
   अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे म्हणाले की, नव्याने पारीत करण्यात आलेले नवीन कृषी कायदे शेतकर्यांना देशोधडीस लावणारे आहे. न्याय, हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या शेतकर्‍यांचे आंदोलनाला बदनाम करुन केंद्र सरकार दडपशाही करत आहे. रस्त्यावर बॅरिकेट, खिळे तर चक्क भिंत बांधून देशातील शेतकर्यांना रोखण्यासाठी एखाद्या सिमेसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. हे हुकुमशाहीचे दर्शन सरकारने घडविले आहे. जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना, शेतकर्यांच्या प्रश्नासाठी केंद्र सरकार आडमुठेपणाचे धोरण सोडण्यास तयार नाही. हे आंदोलन कोणत्या जाती, धर्म व पंथाचे नसून, देशातील शेतकर्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
   कॉ. महेबुब सय्यद यांनी अनेक शेतकर्यांचे बलिदान जाऊन देखील सरकारला जाग आली नसून, देशातील शेतकरी पेटून उठला आहे. केंद्र सरकार मात्र शेतकर्यांच्या संयमाचा अंत पाहत असल्याचे सांगितले. अविनाश घुले यांनी देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने शेतकर्यांचा हा उद्रेक आहे. हिंसक आंदोलन होण्यामागे केंद्र सरकारची आडमुठेपणाची भूमिका जबाबदार आहे. देशाच्या पोशिंद्यावर अन्यायाचा अतिरेक झाला असून, शेतकरी या अन्याया विरोधात क्रांती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. अर्शद शेख यांनी अन्याय, अत्याचार विरोधात आवाज उठवले तर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करते. देशद्रोहाची व्याख्या नेमकी तपासून घ्यावी लागणार आहे. या आंदोलनाने देशाचे सार्वभौमत्व धोक्यात असल्याचे चुकीचे सांगितले जात आहे. या आंदोलनाने देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला नसून, केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या मांडला. रास्तारोको करणार्या आंदोलक नेत्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन रस्ता रहदारीस मोकळा करुन दिला.
   या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे, आर्किटेक अर्शद शेख, युनूस तांबटकर, कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, अंबादास दौंड, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, किसान सभेचे धोंडीभाऊ सातपुते, सिंधूबाई त्रिमुखे, बाळासाहेब पवार, विष्णू म्हस्के, संध्या मेढे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम, अब्दुल गनी शेख, भाऊसाहेब थोटे, रविंद्र फुलसौंदर, कार्तिक पासळकर, दिपक क्षीरसाठ, राजेंद्र कर्डिले, रवी सातपुते, शाहीर कान्हू सुंबे, दिलीप घुले, शकील शेख आदी विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment