नवलेनगर येथील बंदगटार पाईप कामाचा शुभारंभ
प्रभाग समस्यामुक्त करणार : नगरसेविका ज्योती गाडेनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग विकासाचे नियोजन करणे गरजेचे असल्यामुळे विकासा कामाचा आराखडा तयार केला आहे. जेणेकरून एक काम पुन्हा पुन्हा करण्याची गरज पडणार नाही. पुढील 40 वर्षांच्या विकासकामांचे नियोजन केले आहे. त्यानुसार जमिनी अंतर्गत बंदपार्ईप गटार योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम हाती घेतले असून, प्रभाग 4 मधील जमिनी अंतर्गत सर्व कामे मार्गी लागणार आहेत. त्यानंतर रस्त्याची कामे, सुशोभिकरणाची कामे हाती घेऊन प्रभाग समस्या मुक्त करणार आहे, असे प्रतिपादन नगरसेविका ज्योती गाडे यांनी केले.
प्रभाग क्र. 4 मध्ये नवलेनगरमधील बंदपाईप गटार कामाचा शुभारंभ नगरसेविका ज्योती गाडे यांच्या हस्ते संपन्न झाला. ज्योती गाडे पुढे म्हणाले की, आरोग्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी बंदपाईप गटार कामे मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यानुसार कामांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन विकासकामे मार्गी लावत आहोत. याचबरोबर सर्वांच्या सहकार्यातून प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी बोलताना जयंत रेखी म्हणाले की, नवलेनगरमधील बंदपाईप गटार कामाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे पावसाळ्यामध्ये येथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता हा प्रश्न नगरसेविका ज्योती गाडे यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या लवकरच दूर होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उद्योजक अमोल गाडे, जयंत रेखी, विनोद भिंगारे, सुधाकर कुलकर्णी, गोरख रासकर, आदिनाथ म्हस्के, कुमार नवले, मधुकर पोहेकर, अर्जुन अस्वले, बाळासाहेब जोगदंड, शैलेजा पोहेकर, गिरीषा रेखी, गौरी भिंगारे, सीमा थोरात, गीता अस्वले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment