वीज खंडित करून शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे : वाडेकर
अखेर पाच तासानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे !
पारनेर : कृषी पंपाची विज बंद केल्यामुळे वारणवाडी उपकेंद्रावर देसवडे, पोखरी परीसरातील शेतकऱ्यांनी ठीया आंदोलन केले. गेली तीन दिवसांपासुन देसवडे, पोखरी परीसरातील कृषी पंपाची विज कोणतीही पुर्व सुचना न देता विज खंडीत करण्यात आली होती. तीन दिवसांपासुन विज नसल्यामुळे हाता तोंडाशी आलेले पिक पुर्णता नष्ट होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता खंडीत केलेली वीज तात्काळ सुरू करण्यात यावी म्हणुन २० फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासुन शेतकरी ठान मांडुन खडकवाडी उपकेंद्रावर बसले होते. विज खंडीत न करण्याचा शासनाचा आदेश असतानाही अधिकारी मात्र शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.
५ तासाच्या ठीय्या आंदोलनानंतर खंडीत केलेली विज महावितरणचे उपअभियंता निलेश ओव्हळ यांनी विज चालु केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ,संतोष वाडेकर, पोखरी सरपंच सतीश पवार, देसवडे गावचे सरपंच पोपट दरेकर, देसवडे गावचे उपसरपंच सचिन भोर, देसवडे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय भोर, ग्रामपंचायत सदस्य देसवडे सुयोग दाते, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब टेकुडे, ठमाशेठ भोर, युवा नेते संपत तोरकड, राजेंद्र गुंड, नंदन भोर, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास शिवले, रामदास शिंदे निलेश पवार, कारभारी हाडवळे, नामदेव शिवले, बबन पवार, बाळा लक्ष्मण वाकळे, तुकाराम हाडवळे, योगेश दाते, प्रकाश टेकुडे, अजय दाते, बाळासाहेब गुंड, बाबाजी शिंदे, दत्तात्रय तोरकड, शिवाजी तोरकड, संतोष दाते, दिनकर टेकुडे ,पांडुरंग गुंड, बाळासाहेब गुंड ,सुरेश तोरकड, प्रदीप टेकुङे, गणेश टेकवडे, अदिनाथ पुरी, राजु डेरे, सचिन शंकर भोर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment