‘महापौर’ हे विकासाभिमुख नेतृत्व, बुध्द विहारच्या माध्यमातून शांततेचा संदेश- ना. रामदास आठवले
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येवून काम केल्यामुळे समाजाची प्रगती होते. महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सावेडी गांवठाण येथे मनपाच्या माध्यमातून बुध्द विहार बांधून एक प्रकारे शांततेचा संदेश देण्याचे काम केले आहे. यामाध्यमातून सर्व समाज एकत्र येवून आपल्या विचाराची देवाण घेवाण याठिकाणी केली जाईल. तसेच या बुध्द विहारमध्ये सांस्कृतीक व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोपा निर्माण होईल. नगर शहराच्या विकासासाठी पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून देवू नगर शहराला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दोन मजली सुसज्ज इमारत बांधून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कोरोना संकट हळू हळू दूर होत असून देश पूर्वपदावर येत असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. नगर शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी आरपीआय पक्ष वाढविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे नगर शहराशी एक माझे नाते जोडले आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करावी असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.श्री.रामदासजी आठवले यांनी केले. सावेडी गांवठाण येथे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या प्रयत्नातून सुसज्ज असे बुध्द विहारचा लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.श्री.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगर शहरामध्ये ठिकठिकाणी बुध्द विहार बांधण्याची संकल्पना आल्यामुळे हे बुध्द विहार उभे राहिले आहे. अजूनही शहरामध्ये बुध्द विहार उभे करणार आहे. बुध्द विहारच्या माध्यमातून समाज जोडला जातो. विकास कामाबरोबरही नागरिकांना संघटीत करून सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधीलकी जोपासली जाते. लवकरच नगरामध्ये सामाजिक न्याय भवनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा केला जाईल असे ते म्हणाले. यावेळी श्रीमती जयाताई गायकवाड म्हणाल्या की महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी आमच्या वस्तीमध्ये एक बुध्द विहार बांधून दिले त्यामुळे या सभागृहात आम्हाला सामाजिक उपक्रम राबविण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुध्द यांचे विचार या बुध्द विहार मधून आजच्या युवा पिढीला देण्याचे काम होणार आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे, स्थायी समितीचे सभापती मा.श्री.मनोज कोतकर, नगरसेवक मा.श्री.रविंद्र बारस्कर, मा.श्री.राहुल कांबळे, मा.श्री.उदय कराळे, मा.श्री.विलासराव ताठे, मा.श्री.अशोक वाकळे, मा.श्री.बाळासाहेब वाकळे, मा.श्री.किशोर वाकळे, मा.श्री.नितीन शेलार, मा.श्री.पुष्कर कुलकर्णी, मा.श्री.निलेश जाधव, मा.श्री.शिवा आढाव, मा.श्री.शुभम वाकळे, मा.श्री.अजय साळवे, मा.श्री.दिपक मेढे, मा.श्री.सदाशिव भिंगारदिवे, मा.श्रीमती.जयाताई गायकवाड, मा.श्री.विनोद भिंगारदिवे, मा.श्री.चंद्रकांत भिंगारदिवे, मा.श्री.पप्पू भिंगारदिवे, मा.श्री.शुभम भिंगारदिवे, मा.श्री.बाळासाहेब जगताप, मा.श्री.अरूण भिंगारदिवे, मा.श्री.मिलींद भिंगारदिवे, मा.श्री.बाबासाहेब भिंगारदिवे, मा.श्री.राहुल भिंगारदिवे, मा.श्री.पप्पू गर्जे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment