स्वच्छ सर्वेक्षणात मनपा कर्मचारी अत्यंत महत्त्वपूर्ण : उपायुक्त राऊत
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे कामकाज सुरु झाले असून यात मनपाच्या स्वच्छता कर्मचार्यांची भूमिका महत्वाची आहे. स्वच्छता कर्मचारी दररोज आपले शहर स्वच्छ ठेवण्याचे कर्तव्य पार पाडतात. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य निरोगी राहते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्वच्छ सर्वेक्षणाचा भाग म्हणून त्यांचा उप आयुक्त सचिन राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. स्वच्छता कर्मचारी हे मनपा प्रशासनाचा महत्वाचा भाग आहे.
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण चे राहुल आहिरे, सौरभ जाधव, बिडकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment