गाडगीळ पटांगण नालेगाव येथे दत्त जयंती उत्साहात साजरी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय संस्कृती जगात महान आहे. आध्यात्म व धार्मिकतेमुळे आपली संस्कृती टिकून आहे. वैभवशाली परंपरा व संस्कृती टिकवण्यासाठी, तिचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आजच्या युवा पिढीने पुढे आले पाहीजे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाला आध्यात्मिकतेची जोड अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय मुदगल यांनी केले.
छत्रपती शिवराय तरुण मंडळ व पावन हनुमान व्यायाम शाळा यांच्यावतीने गाडगीळ पटांगण येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला त्यावेळी ते बोलत होते.
गुरु दत्तात्रय हे ब्रम्हा विष्णु व महेश यांचा अवतार आहेत. त्यांना असुरी शक्तींचा नाश केला.
आज तरुणांनी आध्यात्मीक व धार्मिक विचारांचा प्रचार प्रसार करणे काळाची गरज असल्याचे श्री मुदगल यावेळी म्हणाले. उत्सवानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे सदस्य व भाविक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment