बिनविरोध निवडणुका लढवणार्या ग्रामपंचायतीला एकवीस लाखांचा निधी देणार ः आ. आजबे
नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः आष्टी मतदार संघातील ज्या गावातील ग्रामपंचायत निवडणुका बिंविरोध होतील अशा गावांना आगामी काळात प्रत्येकी 21लाखाचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी घोषणा आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील निलेश लंके, अकोला येथील डॉक्टर किरण लहामटे, परभणीचे आ. राहुल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करणार्या गावांना 20 ते 25लाख रुपये विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
ग्राम समितीचे पोपटराव पवार यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. आष्टी मतदारसंघात तेवीस ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. आ. बाळासाहेब आजबे यांनी देखील बिनविरोध निवडणूक घेणार्या ग्रामपंचायतीला आगामी पाच वर्षांच्या काळासाठी प्रत्येकी एक वीस लाख रुपयाचा विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यातील दहा लाखांचा निधी आमदार निधीतून तर अकरा लाखाचा निधी कंपनी विकास निधीतून (सी एस आर फंड)देण्यात येणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment