प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचे जतन करावे : राजेश भंडारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, November 28, 2020

प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचे जतन करावे : राजेश भंडारी

 प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचे जतन करावे : राजेश भंडारी


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः आपण समाजाचे काही देणे लागतो, या सामाजिक बांधीलकीच्या भावनेतुन सर्वांनी काम केले पाहीजे. हिंदु धर्मामध्ये गोमातेला विशेष महत्व आहे. गोमातेची सेवा व संगोपन करणे ही काळाची गरज असून आपल्या जीवनातील आनंदी क्षण साजरे करतांना आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहीजे असे प्रतिपादन महावीर कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश भंडारी यांनी केले.
    श्री राजेश भंडारी यांच्या वाढदिवसानिमीत्त अरुणोदय गोशाला येथे जनावरांना चारा वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक मयुर शेटीया, डॉ. सचिन भंडारी, कमलेश भंडारी, गणेश गोंडाळ, शैलेश गांधी, पिंटू कटारिया आदी उपस्थित होते. श्री गणेश गोंडाळ म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील वाढदिवस साजरे करत असतांना गो सेवा, गरजूंना मदत असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यातुन आत्मीक समाधान मिळते. अरुणोदय गोशाळेचे संचालक मनिष फुलडहाळे हे सुमारे 500 गायींचे संगोपन करीत असून त्यांना मदतीची खरी गरज आहे.

No comments:

Post a Comment