पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा; लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढले देशात दुसर्यांदा लॉकडाउन
नवी दिल्ली : जगात कोरोनाचे संकट आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे नुकसान टळले आहे. कोणाला जेवणाचा, कोणाला येण्याजाण्याचा त्रास झाला, तुम्ही सगळयांनी हा त्रास सहन केला. तुम्ही शिस्तबद्ध सैनिकासारखे आपले कर्तव्य बजावत आहेत. मी तुम्हाला सलाम करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचवेळी कोरोनाचे संकट लक्षात घेता आणि सगळ्यांच्या मागणीचा विचार करुन 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची मोठी घोषणा मोदी यांनी यावेळी केली. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात दुसर्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केले होते. आज 14 एप्रिलला हे लॉकडाऊन संपणार होते. मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मोदी यांनी लॉकडाऊनचा कालवधी वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊन उठवले तर गंभीर परिणाम दिसून येतील असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केली आहे.
कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. कारण लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्यांनी केलेल्या सूचनांनंतर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कोरकोनाविरोधातल्या लढाईत आता कठोरता वाढवण्यात येणार आहे. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने केला जाईल. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक क्षेत्राचे मुल्यांकन करण्यात येईल. जिथे कोरोनाचे रूग्ण कमी आढळतील, जिथे हॉटस्पॉट वाढणार नाही, अशा ठिकाणी 20 एप्रिलनंतर काही काही सेवा सुरू केल्या जातील. सरकारकडून यासंदर्भात एक गाईडलाईन उद्या जारी करण्यात येईल, असे ते म्हणालेत.
भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नसती तर काय झाले असते याच्या कल्पना न केलेली बरी. अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नसले तरी देखील तुलनेने भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 30 टक्क्यांनी कमी आहे. सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउनचा मोठा लाभ देशाला मिळाला आहे. लॉकडाऊन वाढवा ही नागरिकांची मागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊमुळे आर्थिक नुकसान होतेच, मात्र ते जतेच्या जीवापेक्षा मोठे मानता येणार नाही. समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरु केले. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. भारतीय नागरिकांनी दाखवलेला संयम प्रेरणादायी आहे. देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले. त्याचेवळी पंतप्रधान मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मी डॉ. बाबासाहेब आंबोडकरांना नमन करतो, असे मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणालेत. मोदी यांनी देशातील विविध राज्यांमधील सण आणि नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
कोरोना रोखण्यासाठी मोदींनी सांगितली ‘सप्तपदी’
घरातील ज्येष्ठ नागरिकांची, विशेषत ज्यांना जुना कोणता आजार असेल, त्यांची विशेष काळजी घ्या.
लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि घरात वापरलेल्या मास्कचा वापर करा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा.
आरोग्य सेतु अॅप डाऊनलॉड करा.
गरीब कुटुंबीयांची विशेष काळजी घ्या. त्यांना अन्न द्या.
सोबत काम करणार्या कर्मचार्यांशी सहानुभूतीने वागा, कोणालाही कामावरुन कमी करु नका.
कोरोना वॉरीयर्स (डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार) यांचा सन्मान करा.
नवी दिल्ली : जगात कोरोनाचे संकट आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारत सुरक्षित आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे नुकसान टळले आहे. कोणाला जेवणाचा, कोणाला येण्याजाण्याचा त्रास झाला, तुम्ही सगळयांनी हा त्रास सहन केला. तुम्ही शिस्तबद्ध सैनिकासारखे आपले कर्तव्य बजावत आहेत. मी तुम्हाला सलाम करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचवेळी कोरोनाचे संकट लक्षात घेता आणि सगळ्यांच्या मागणीचा विचार करुन 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची मोठी घोषणा मोदी यांनी यावेळी केली. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात दुसर्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केले होते. आज 14 एप्रिलला हे लॉकडाऊन संपणार होते. मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मोदी यांनी लॉकडाऊनचा कालवधी वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊन उठवले तर गंभीर परिणाम दिसून येतील असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केली आहे.
कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. कारण लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्यांनी केलेल्या सूचनांनंतर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कोरकोनाविरोधातल्या लढाईत आता कठोरता वाढवण्यात येणार आहे. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने केला जाईल. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक क्षेत्राचे मुल्यांकन करण्यात येईल. जिथे कोरोनाचे रूग्ण कमी आढळतील, जिथे हॉटस्पॉट वाढणार नाही, अशा ठिकाणी 20 एप्रिलनंतर काही काही सेवा सुरू केल्या जातील. सरकारकडून यासंदर्भात एक गाईडलाईन उद्या जारी करण्यात येईल, असे ते म्हणालेत.
भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नसती तर काय झाले असते याच्या कल्पना न केलेली बरी. अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नसले तरी देखील तुलनेने भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 30 टक्क्यांनी कमी आहे. सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाउनचा मोठा लाभ देशाला मिळाला आहे. लॉकडाऊन वाढवा ही नागरिकांची मागणी करण्यात आली आहे. लॉकडाऊमुळे आर्थिक नुकसान होतेच, मात्र ते जतेच्या जीवापेक्षा मोठे मानता येणार नाही. समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरु केले. त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. भारतीय नागरिकांनी दाखवलेला संयम प्रेरणादायी आहे. देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले. त्याचेवळी पंतप्रधान मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मी डॉ. बाबासाहेब आंबोडकरांना नमन करतो, असे मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणालेत. मोदी यांनी देशातील विविध राज्यांमधील सण आणि नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
कोरोना रोखण्यासाठी मोदींनी सांगितली ‘सप्तपदी’
घरातील ज्येष्ठ नागरिकांची, विशेषत ज्यांना जुना कोणता आजार असेल, त्यांची विशेष काळजी घ्या.
लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि घरात वापरलेल्या मास्कचा वापर करा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा.
आरोग्य सेतु अॅप डाऊनलॉड करा.
गरीब कुटुंबीयांची विशेष काळजी घ्या. त्यांना अन्न द्या.
सोबत काम करणार्या कर्मचार्यांशी सहानुभूतीने वागा, कोणालाही कामावरुन कमी करु नका.
कोरोना वॉरीयर्स (डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार) यांचा सन्मान करा.
No comments:
Post a Comment