आज सायं. 6 ते स. 6 पर्यंत
अत्यावश्यक सेवा फक्त 12 तास बंद
अहमदनगर ः कोरोना चा प्रादुर्भाव रोखणे प्रतिबंध व्हावा म्हणून शासनाने महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन केलेले असून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आज आज मुस्लिम धर्मीयांचा शब ए बारात हा सण आहे.
या दिवशी जास्त गर्दी होऊ नये व हा सण मुस्लिम बांधवांना घरात राहूनच साजरा करावा, जेणेकरून गर्दी टाळता येईल व करुणा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध होईल. आज रोजी अत्यावश्यक किराणा दुकाने, दुध, फळे, भाजीपाला, मेडिकल्स् यांची दुकाने सायंकाळी 6 ते दुसर्या दिवशी सकाळी 6 वाजपर्यंत बंद ठेवण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी त्रिवेदी यांनी दिलेला आहे.
राज्य शासनाने कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या कारणासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा फक्त 12 तास बंद
अहमदनगर ः कोरोना चा प्रादुर्भाव रोखणे प्रतिबंध व्हावा म्हणून शासनाने महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन केलेले असून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आज आज मुस्लिम धर्मीयांचा शब ए बारात हा सण आहे.
या दिवशी जास्त गर्दी होऊ नये व हा सण मुस्लिम बांधवांना घरात राहूनच साजरा करावा, जेणेकरून गर्दी टाळता येईल व करुणा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध होईल. आज रोजी अत्यावश्यक किराणा दुकाने, दुध, फळे, भाजीपाला, मेडिकल्स् यांची दुकाने सायंकाळी 6 ते दुसर्या दिवशी सकाळी 6 वाजपर्यंत बंद ठेवण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी त्रिवेदी यांनी दिलेला आहे.
राज्य शासनाने कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या कारणासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment