14 गुंठे शेतीच्या वादातून हाणामारी; एकाचा मृत्यू..
रायपूर येथे अवघ्या १४ गुंठे जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीतील गंभीर जखमी भिकन खंडू घिटरे या शेतकऱ्याचा बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिल्लेगाव ठाण्यात आधीच नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला असल्याने आता कलम वाढवून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
अवघ्या १४ गुंठे जमिनीसाठी तब्बल ३५ वर्षे न्यायालयात प्रकरण चालले. शेवटी निकाल लागला. ज्यांच्या बाजूने निकाल लागला, त्यांना २६ जून रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान शासकीय मोजणी करून सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होती. ज्यांच्या विरोधात निकाल गेला त्यांनी भिकन घिटरे यांच्या डोक्यात लोखंडी अँगल मारून गंभीर जखमी केले होते.
भानुदास फकिरराव घिटरे, ज्ञानेश्वर एकनाथ घिटरे, एकनाथ फकिरराव घिटरे, गंगाधर फकिरराव घिटरे, यशवंत देविदास घिटरे, देविदास फकिरराव घिटरे, शुभम देविदास घिटरे, बिराबाई, वर्षा घिटरे (सर्व रा. रायपूर, ता. गंगापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.
No comments:
Post a Comment