अहमदनगर नामांतराला विरोध नाही.., त्याचबरोबर आमदारांनी केली ही मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 3, 2023

अहमदनगर नामांतराला विरोध नाही.., त्याचबरोबर आमदारांनी केली ही मागणी.

जिल्ह्याचे विभाजन झाले तरच...., नगर शहरासह दक्षिण भागाचा विकास.

अहमदनगर : अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर असे करावे, ही मागणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेकडून ठराव मागविला  असताना आता नामांतरासोबतच जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मत व्यक्त केला आहे.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, नामांतराला आपला विरोध नाही. तो निर्णय स्थानिक पातळीवर व्हावा, मात्र त्यासोबतच जिल्ह्याचे विभाजन व्हावे. त्यामुळे नगर शहरासह दक्षिण भागाचा विकास होईल, असे मत आ.जगताप यांनी मांडले आहे.

No comments:

Post a Comment