अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात घरातून निघून जात लग्न करणाऱ्यांची मोठी आकडेवारी समोर आल्यानंतर याबाबत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ज्या पद्धतीने नव्या पिढीतील सुशिक्षित मुलं आणि मुली हे आपल्या आई-वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न करू लागली आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पलायन करून विवाह करण्यावर निर्बंध आणण्याचा एखाद्या कायदा यावा, अशी सगळ्यांची मागणी असल्याचे मत खासदार सुजय विखे यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
नगर जिल्ह्यामध्ये महिन्याला अशा प्रकारची जवळपास दीडशे प्रकरणे आढळून येतात आणि हा समाजाला एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. यातून समाजात त्यांच्या आई-वडिलांची प्रतिमा किंवा नातेवाईकांची प्रतिमा खराब होते, हे मला वाटतं फार दुर्दैवी आहे. अशा प्रकरणांमुळे सामाजिक तेढ निर्माण होईल आणि आई-वडिलांचा मुला- मुलींवरील आणि मुला-मुलींचा आई-वडिलांवरील विश्वास कमी होत जाईल आणि हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे,' अशी भावनाही सुजय विखे यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment