गणपती विसर्जनाला शाळांना सुट्टी असताना काही शाळा सुरू का?
मनसेचे नितीन भुतारे यांचा सवाल.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः संपूर्ण भारतात महाराष्ट्रात मोठया भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा केला जातो गणपती विसर्जन च्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र हा बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तीत तल्लीन असतो परंतू काही शाळांना मात्र या दिवशी अहमदनगर मधील सुट्टी असताना देखील सुट्टी दिली गेली नाही. त्यामुळे आपण नगर शहरातील गणपती विसर्जन च्या दिवशी चालु ठेवलेल्या शाळांवर त्यांच्या संचालकांवर मुख्याध्यापकांवर तसेच जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणं मंत्री यांना मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिंदे सरकार ने फक्त हिंदुत्वाचा दिखावा करू नये त्या बरोबर हिंदुत्व हि जपणे गरजेचे आहे. असेही भुतारे यांनी निवेदनात म्हटले आहे.
हिंदु धर्माच्या विरोधात वागणार्या अश्या शाळांवर कारवाई करणे गरजेच आहे भाजप व शिंदे सरकार आज हिंदुत्वाच्या नावावर सत्तेत आहे असे असताना देखील या सत्तेत गणपती विसर्जन च्या दिवशी शाळा सूरू कश्या राहतात असा प्रश्न मनसे सचिव नितिन भूतारे यांनी उपस्थित केला असून यापुढे हिंदुत्वाच्या बाबतीत कोणी अश्या प्रकारचा हलगर्जी पणा केल्यास तो मनसे सहन करणार नाही असा इशारा देखील मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला.
No comments:
Post a Comment