पारनेर विद्युत महावितरण कडून रोहित्र बंद करून सक्तीने वीज वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी आंदोलन.
नगरी दवंडी
पारनेर -अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाली २०१८ पासून पिक विमा कंपन्या कडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली कोरोणा महामारीमुळे शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पुरता अडचणीत सापडला आहे.सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतीची लगबग सुरू आहे या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असताना वीज महावितरण कडून रोहित्र बंद करून वीज बिलांच्या नावाखाली सक्तिने पठाणी वसुली सुरू केली आहे याविषयी वारंवार त्यांना सांगूनही रोहित्र बंद करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. याच्या निषेधार्थ तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी रास्ता रोको करत असल्याची माहिती भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, तालुकाध्यक्ष विशाल करंजुले,युवक तालुकाध्यक्ष रावसाहेब झांबरे यांनी दिली आहे.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पूर्णता महावितरण जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment