जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांचा अहमदनगर पत्रकारांच्यावतीने सत्कार.
अहमदनगर ः जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची मुंबई येथे मंत्रालयात बदली झाली आहे. या कारणास्तव आयोजित चव्हाण यांच्या औपचारिक निरोप समारंभ कार्यक्रमात अहमदनगर येथील पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर प्रेस क्लबचे कार्यकारिणी सदस्य निशांत दातीर, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तथा औरंगाबाद येथील जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, दैनिक ‘नगरी दवंडी’चे संपादक राम नळकांडे, ‘उर्दू मखदुम’चे अबीद खान दुलेखान, ‘ज्ञानधारा’चे जयंत देशपांडे, ‘सिटीवॉच’चे असद शेख, प्रेस फोटोग्राफर राजू खरपुडे, ‘नगरवेध’चे संदीप दिवटे आदींसह पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment