10 दिवसांत मंदिरे खुली न केल्यास...शहरात उग्र आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

10 दिवसांत मंदिरे खुली न केल्यास...शहरात उग्र आंदोलन

 10 दिवसांत मंदिरे खुली न केल्यास...शहरात उग्र आंदोलन

शहरातील मंदिरात घंटानाद व महाआरती संपन्न

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः सर्व देव देवता हे हिंदूंची शक्ती स्थळे आहेत. भगवंताने मुख्यमंत्री व सर्व मंत्रींना सर्व मंदिरे उघडण्याची सद् बुद्धी द्यावी, यासठी शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये महाआरती केली आहे. जर येत्या 10 दिवसात राज्य सरकारने सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली न केल्यास शहरात उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंदिर बचाओ कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते वसंत लोढा यांनी दिला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शासनाने सुट दिल्या नंतर आता सर्व काही सुरळीत सुरु झाले आहे. मात्र अद्याप सर्व मंदिरे बंदच ठेवली आहेत. करोना काय फक्त मंदिरातून वाढणार आहे काय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आघाडी सरकार भक्तांच्या भावनांशी खेळत आहेत असे लोढा म्हणाले.राज्यासह जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद असल्याच्या निषेधार्थ नगर मंदिर बचाओ कृती समितीच्यावतीने आज सकाळी शहरातील विविध भागातील मंदिरे उघडून घंटानाद व महाआरती करण्यात आल्या. जयघोषाच्या घोषणा देत शहरातील 5 मंदिरांची दारे उघडण्यात आली. यात गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिर, गौरीशंकर मित्र मंडळाचे तुळजाभवानी माता मंदिर, सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, दिल्लीगेट येथील शनी मारुती मंदिर व जेलरोड वरील तुळजाभवानी माता मंदिर आदी ठिकाणी महाआरती करण्यात आल्या. यावेळी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे, मराठा सेवा संघाच्या सुरेखा सांगळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, कैलास दळवी, राजकुमार जोशी, बाळासाहेब खताडे, मुकुंद वाळके, वीनोद बोगा, रवी दंडी, सागर शिंदे, प्रवीण परदेशी, गणेश पलंगे, विनोद काशीद आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment