तुळजाभवानी मंदिराच्या आवारात परिवर्तन प्रतिष्ठानकडून वृक्षारोपण
नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः पाथर्डी तालुक्यातील पूर्व भाग हा नेहमीच दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे या भागात पर्यावरणाचा समतोल साधला जावा म्हणून झाडे लावली पाहिजेत झाडे अपाल्याला,जीवन जगण्यासाठी ऑक्सीजन देतात फळे व सावली दे तात प्रत्येकाने आपल्या दारात का होईना एक झाड लावले पाहिजे असे उदगार महाराष्ट्र आयुक्त दिलीप खेडकर यांनी काढले. परिवर्तन प्रतिष्ठान भालगाव यांच्या सौजन्याने यांच्या टीम ने तुळजाभवानी मंदिर तुळजवाडी या देवीच्या टेकडीवर या परिवर्तन प्रतिष्ठानच्या झाडे लावण्यात आले यासाठी लागणार्या संवर्धन जाळ्या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आल्या या वेळी यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी प्रत्येकी एक झाड लावले भालगाव गटामध्ये हरित क्रांती घडणार असा विश्वास भालगाव चे सरपंच मनोरमाताई खेडकर यांनी व्यक्त केला. यावेळी परिवर्तन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा तथा भालगाव सरपंच डॉ.मनोरमाताई खेडकर यांच्या शुभहस्ते जय तुळजाभवानी संस्थान, तुळजवाडी येथील टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला . सोबत विभागिय प्रदुषण आयुक्त दिलीपराव खेडकर, परिवर्तन प्रतिष्ठान चे सचिव तथा भाजपा तालुकाध्यक्ष माणिकमामा ,महंत रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी , तुळजाई संस्थान अध्यक्ष हभप खताळ महाराज, बाळासाहेब पाखरे गहिनीनाथ थोरे पाटील सरपंच पिंपळगव्हाण, भगवान हजारे, सचिन बाबासाहेब पालवे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment