कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात, एकाच रांगेत 40 मृतदेह! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात, एकाच रांगेत 40 मृतदेह!

 कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात, एकाच रांगेत 40 मृतदेह!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली तळीये गावाला भेट; मदतीचे दिले आश्वासन..

रायगड ः महाड तालुक्यातील तळीये गावात होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणार्‍या गावचं आता संपूर्ण स्मशान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावाला भेट दिली असून मदतीचे आश्वासन दिले आहे. 22 जुलैला दुपारी 4 वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास 35 घरं ढिगार्‍याखाली गाडली गेली. या 35 घरांतील जवळपास 70-80 माणसंही ढिगार्‍याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणार्‍याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाडली गेली आहेत. रायगड जिल्हा वर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
तळये दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे.अनेक नातेवाईक डोळे लावून वाट बघताय आमच्या नातेवाईक कधी बघायला मिळतील. तळीये गावात रेस्क्यू ऑपरेशन जोरात सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत इतर ठिकाणच्या सुद्धा रेस्क्यू टीम दाखल होत आहेत. ठाणे शहरातील एक रेस्क्यू ऑपरेशन टीम तळीये गावात पोहोचली. महाड तालुक्यातील तळीये गावात घडलेल्या दुःखद घटनेने संपूर्ण देश भरातून हळहळ व्यक्त केली जातीय. दरड कोसळल्याने संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं आहे. यामध्ये आतापर्यंत 38 नागरिकांचा मृत्यू झालाय तर अजून 40 ते 50 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. दरड कोसळल्यामुळे 32 ते 35 घर जमीन दोस्त होऊन उताराच्या दिशेने सर्व वाहून गेले. यात मृतदेहही खाली वाहून गेले आहेत. एनडीआरएफचे जवान शोध घेत आहेत.
महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगार्‍याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.
दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

No comments:

Post a Comment