1,153 शाळा, महाविद्यालये अद्याप बंदच.
अखेर शाळेची घंटा वाजली पण...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर काल जिल्ह्यातील 133 शाळा व महाविद्यालयांची घंटा वाजली असली तरी उर्वरित 1 हजार 153 शाळा, महाविद्यालये मात्र बंदच आहेत.
कोरोना मुक्त झालेल्या गावात इयत्ता आठवी ते बारावीची शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला होता मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव व पालकांची संमती असणे आवश्यक होते. मात्र आतापर्यंत केवळ 10 ग्रामपंचायतींनीच शाळा सुरू करण्याबाबतचे ठराव घेतले होते. कोरोना मुक्त झालेल्या नगर जिल्ह्यातील 849 गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला.मात्र काल पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 133 शाळा व महाविद्यालये सुरू झाले आहेत. आदिवासी तालुका असलेल्या अकोल्यात सर्वाधिक 45 शाळा व महाविद्यालये सुरू झाले आहेत. सर्वात कमी कर्जत तालुक्यात केवळ एक शाळा सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यासाठी आदर्श असलेल्या हिवरेबाजार कोरोना मुक्त पॅटर्न असलेल्या नगर तालुक्यात गुरुवारी केवळ सात शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. पारनेर व श्रीरामपूर तालुक्यात केवळ दोन शाळा सुरू झालेल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. पारनेर, श्रीगोंदे तालुक्यात ही संख्या मोठी आहे. त्यातच गुरुवारपासून शाळा, महाविद्यालय सुरू झाले. तिसर्या लाटेची शक्यता असल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येणे टाळत आहेत. शिवाय पालकही संमती देत नाहीत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. काही गावे कोरना मुक्त झाली आहेत. कोरोना मुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. हे वर्ग सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीला ठराव घेऊन पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला पाठवावा लागतो. विद्यार्थ्यांच्या पालकांचा हमीपत्र भरून द्यावे लागते शिक्षकांनी बाहेरगावाहून जाऊन येऊन करू नये. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंसिंग) पालन आवश्यक आहे. वर्गाबाहेरच विद्यार्थ्यांचे तापमान आणि पल्स ची तपासणी केली जाते. तापमान असणार्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो पुस्तक वही पेन इतरांचा वापरू नये, पिण्याच्या पाण्यासाठी बाटली आणावी. आधी अटीचे पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. जिल्ह्यात पहिल्या दिवशी 133 गावांमध्ये माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment