औरंगाबाद खंडपीठाची राज्यमंत्री तनपुरे, मनपा आयुक्तांना नोटीस. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

औरंगाबाद खंडपीठाची राज्यमंत्री तनपुरे, मनपा आयुक्तांना नोटीस.

 औरंगाबाद खंडपीठाची राज्यमंत्री तनपुरे, मनपा आयुक्तांना नोटीस.

मनपा अभियंत्यांची पाठराखण भोवणार...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधीलनगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना नगर महापालिकेच्या नगररचना विभागातीलअभियंते कल्याण बल्लाळ यांना पाठीशी घालणे भोवण्याची चिन्हे आहेत. याअभियंत्यावरील कार्यवाहीला नगरविकास राज्यमंत्री म्हणून तनपुरेंनी दिलेल्या स्थगितीलायेथील सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादखंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्यमंत्री तनपुरेंसह प्रधानसचिव, मनपा आयुक्त व अभियंते बल्लाळ यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले असून,याप्रकरणाची पुढील सुनावणी 16 जुलैला होणार आहे.
नगरच्या महापालिकेतील उप अभियंता कल्याण बल्लाळ यांना पदावनत करण्याबाबतच्या कार्यवाहीस नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलेल्या स्थगिती विरोधात मुंबईउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शेख यांनी याचिका दाखल केली आहे. त्याचीसुनावणी नुकतीच 16 जून 2021 रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती रवींद्रघुगे यांच्यासमोर झाली. त्या सुनावणीत याचिकाकर्तेशेख यांच्यावतीने अ‍ॅड.आविष्कार शेळके यांनी बाजू मांडली व त्यांना अ‍ॅड. अर्जुन लूक यांनी सहाय्यकेले तर सरकारच्यावतीने अ‍ॅड. व्ही.एन.पाटील-जाधव यांनी बाजू मांडली.दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनपा आयुक्त व बल्लाळ यांच्यासहनगरविकास मंत्री तनपुरे व राज्याच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्याचे आदेशदिले आहेत. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व नगरविकास राज्यमंत्री तनपुरेयांच्यावतीने देखील अ‍ॅड. पाटील-जाधव यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी16 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
या याचिकेबाबत माहिती देताना शेख यांनी सांगितले की, कल्याणबल्लाळ हे 1995 साली तत्कालिन नगरपरिषदेमध्ये सबओव्हरसीयर या पदावर रुजू झाले. सन2000 मध्ये कनिष्ठ अभियंता ज्युनिअर इंजिनिअर हे भटक्या जमातीसाठी एन.टी.पद सरळ सेवेने भरती करण्यासाठी राखीव असताना त्या पदावर कल्याण बल्लाळयांना नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली. वास्तविक बल्लाळ अनुसूचित जमाती एसटीप्रवर्गाचे असतानाही त्यांनाही पदोन्नती बेकायदेशीरपणे देण्यात आली. त्यानंतरच्या काळातमनपाने बल्लाळ यांना उपअभियंता पदावर पदोन्नतीदेखील दिली. या विरोधात सामाजिककार्यकर्तेशाकीर शेख यांनी शासनाच्या नगरविकासविभागाकडे सन 2011 पासूनपाठपुरावा करीत नियमबाह्यपणे पदोन्नती झाल्याचे निदर्शनासआणून दिले. सन 2020 मध्ये शासनाने त्याची दखल घेऊन बल्लाळ यांच्या पदोन्नतीबाबत नियुक्तप्राधिकारी या नात्याने मनपा आयुक्त यांनी एक महिन्यात निर्णय घ्यावा व त्याप्रमाणे बल्लाळयांना पदोन्नती देण्यात झालेल्या अनियमिततेस जबाबदार असणार्या संबंधित अधिकारी-कर्मचारीयांच्यावर जबाबदारी निश्चित करुन त्यांच्याविरोधात नियमानुसार शिस्तभंगाची कारवाईकरण्यात यावी, असे आदेश 28 फेब्रुवारी 2020 रोजी काढले. त्याप्रमाणे तत्कालिनआयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी कार्यवाही न करता वेळकाढूपणा केला. त्याबाबतशेख यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार करुन ही बाब निदर्शनास आणून दिली.त्यावरुन शासनाने ता. 10 नोव्हेंबर 2020 रोजी मनपा आयुक्त यांना बल्लाळ यांची शाखाअभियंता या पदाच्या पदोन्नती साखळीतील सबओव्हरसीयर या पदाच्या समकक्ष पदावर पदावनतकरण्याचा निर्णय घेण्याचेआदेश दिले. पण, त्याप्रमाणे आयुक्त यांनी कार्यवाही न करताबल्लाळ यांना मोकळीक दिली. मात्र, या पदावनत करण्याच्या कार्यवाहीस रद्द करण्याबाबत बल्लाळयांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धाव घेतली. त्यांना चुकीचीमाहिती देत बल्लाळ यांनीपदावनतबाबतच्या कार्यवाहीस स्थगिती मिळविली. त्यामुळे बल्लाळयांनी मिळविलेल्या स्थगिती विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीआहे, असे शाकीर शेख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment