जिजाऊ व लक्ष्मीबाई यांचे कार्य आजच्या महिलांसाठी दीपस्तंभ -पै. नाना डोंगरे
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे, संतोष ठाणगे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, अक्षरा येवले, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, कार्तिक डोंगरे, मयूर काळे, कृष्णा डोंगरे, जनाबाई शिंदे आदी उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे म्हणाले की, राजमाता जिजाऊ व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी गुलामगिरी व अन्यायाविरोधात बंड केले. स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराज घडविले. तर राणी लक्ष्मीबाई यांनी आपले साम्राज्य वाचविण्यासाठी अन्यायकारक ब्रिटीश राजवटी विरोधात लढा दिला. समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जात असताना त्या काळात या रणरागिणींनी कर्तृत्वसिध्द करुन महिलांची मान उंचावली. जिजाऊ व लक्ष्मीबाई यांचे कार्य आजच्या महिलांसाठी दीपस्तंभ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment