कोरोनाच्या दोन्ही लाटेत 15 पोलिस कर्मचार्यांचा मृत्यू.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या व दुसर्या लाटेत पोलिस दलातील 3 हजार पोलिस अधिकारी कर्मचार्यांना पूर्ण निबर्ंध लागू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. हे प्रयत्न करत असताना पहिल्या लाटेत 5, तर दुसर्या लाटेत 10 अशा 15 कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात एका महिला पोलीस कर्मचारीचा देखील समावेश आहे. सहायक फौजदार 04, पोलीस हवालदार 07, महिला पोलीस हवालदार 01, पोलीस नाईक 02, पोलीस शिपाई 01 यांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी मार्च 2020 मध्ये करोनाचे सावट आले. 22 मार्च 2020 रोजी सरकारने जनता कर्फ्यूचे आवाहन केले. त्या दिवसापासून पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. पहिल्या लाटेमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी लोकांच्या होणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर होती. फेब्रवारीमध्ये करोनाची दुसरी लाट येऊन धडकली. या लाटेमध्ये करोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. यामुळे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांचा संपर्क थेट लोकांशी येत होता. रुग्णालये, अमरधाम येथेही पोलिसांना ड्यूटी करावी लागली. या सर्वांमध्ये अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली. सुदैवाने दुसर्या लाटेच्या वेळी करोना लस आल्याने तात्काळ पोलिसांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे अनेकांना संसर्ग झाला तरी त्रास झाला नाही. तरीही जानेवारी ते मे या कालावधीत जिल्हा पोलीस दलातील 10 कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment